माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

सागरकिनारा..!!

🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🏖️🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

"रुपेरी वाळुत माडांच्या बनात ये ना"

" चंदेरी चाहुल लावीत प्रितीत ये ना"
" बनात ये ना...जवळ घे ना...हाय..."

हे गाणं ऐकलं...की आपसुकच आठवतो...रम्य सागरकिनारा...!!

        आपल्याला सर्वांनाच आवडतो..आपलासा वाटतो
" सागरकिनारा.."


          सुर्योदय , सुर्यास्ताच विलोभनीय दृश्य पहायचं असेल...भेळ खात..मित्र- मैत्रींणीसोबत मजा करायची असेल...तर योग्य जागा म्हणजे
" समुद्रकिनारा "....हो ना...??

        समुद्राच्या लाटांचा आवाज...मन सुखावणाराच...मन नैराश्याने ग्रासलेल असेल...काय करावं काही सुचत नसेल...कुणाशी बोलावंसं वाटत नसेल...एकांत हवा असेल...तर...,

हमखास...आपली साथ देणारा...आपलं म्हणणं शांतपणे ऐकुन घेणारा एक मित्र असतोच...,
" समुद्रकिनारा "

याच समुद्रकिनाऱ्याशी किती आठवणी जोडलेल्या असतात आपल्या...काही चांगल्या..तर काही वाईट...पण...या आठवणींचा साक्षीदार असतो आपला आवडता हाच " समुद्रकिनारा... "

         वरवरं शांत भासणारा हा समुद्रकिनारा म्हणजेच पर्यायाने समुद्र नजाणे कितीतरी वादळ घेऊन बसलेला असतो मनात..अगदी स्थितप्रज्ञासारखा...!!

आपलं मनही असंच असतं ना...समुद्रकिनाऱ्यासारखचं...
कितीतरी विचारांच्या , ईच्छांच्या , अपुर्ण स्वप्नांच्या लाटा आदळत असतात दररोज मनाच्या किनाऱ्यावर...मनाच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या या लाटा शांत करण्यासाठी...शेवटी प्रत्येकाला गरज भासतेच कधीनाकधी...

" समुद्रकिनाऱ्याची...!!"

समुद्राशीच संबंधीत..तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लीहीलेल गीत...सहजच आठवलं आता...

" ने मजसी ने...परत मातृभुमीला..."
" सागरा..प्राण तळमळला...!!"

🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊

©️®️

✍️...🧚‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

१२ टिप्पण्या:

  1. सावरकरांच्या कवितेच्या संदर्भ देऊन सुंदर लेखन केले मॅडम!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. सुरुवात आणि शेवटासह पुर्ण रचना छानच 🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...